Roshan More
पाण्याच्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडमधील चवतार तळे येथे सत्याग्रह केला.
दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास बंदी होती. सरकारने ही बंदी उठवली तरी सवर्ण दलितांना पाणी भरू देत नव्हते.
महाडची पाणी परिषद भरण्यात आली होती. त्यासाठी जागा फत्तेखान या मुस्लिम व्यक्तीने दिली होती.
बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर ओंजळभर पाणी हातात घेतले. त्यांच्या अनुयायांनी त्याचे अनुकरण केले.
या सत्याग्रहानंतर दलिलांवर उच्च वर्णीयांकडून हल्ला करण्यात आला.
सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना महाड सत्याग्रहासाठी सहकार्य केले.
महाड सत्याग्रह दिन हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो आहे.