Pradeep Pendhare
कॉक्रोच जनता पार्टी 6 जूनला नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत आंदोलनाचा घोषणा केली आहे.
सीजेपीला आंदोलन सुरू ठेवण्यासाठी फंडिंगची आवश्यक असल्याने, फंडिंग कसे उपलब्ध होणार, हा प्रश्न विचारला जात आहे.
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी पक्षाच्या फंडिंग संदर्भातील प्रश्नाचं खणखणीत उत्तर देत, सत्ताधाऱ्यांना तरुणाची ताकद दाखवली आहे.
सौरव दास यांना सीजेपीच्या फंडिंगबद्दल, "फंडिंग कशासाठी हवं आहे?", पोस्टरसाठी सर्वांनी एक-एक रुपया दिला, तर 200 रुपयांचं पोस्टर तयार होणार नाही का? असा प्रतिप्रश्न केला.
तरुणांनी रस्त्यावर उतरायचं आहे, जंतर-मंतर पोहोचायचं आहे, तर ऑटोरिक्षावर 100 रुपये खर्च करू शकत नाही का? त्यासाठी फंडिंग कशाला हवं? असंही सौरव दास यांनी म्हटलं.
कोणतंही आंदोलन असो, जेव्हा एक चांगलं आंदोलन होतं, तेव्हा त्याच्याविरोधात एक काउंटर नरेटिव्ह चालवलं जातं, याची साक्ष इतिहास देतो, असेही सौरव दास यांनी म्हटलं.
कॉन्स्पिरसी थिअरी चालवली जाते. फंडिंगचा मुद्दा आणला जातो, परकीय शक्तीचा मुद्दा आणला जातो, अशा अनेक कहाण्या मांडल्या जातात, असंही सौरव दास यांनी स्पष्ट केलं.
आमच्या दृष्टीनं या गोष्टीची एकप्रकारे खातरजमा झाली आहे की हे आंदोलन योग्य दिशेनं पुढे जात आहे. त्यामुळेच अशा कहाण्या मांडल्या जात आहेत, असं ते म्हणाले.
'कॉक्रोच जनता पार्टी' या सोशल मीडिया मोहिमेचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 6 जून रोजी भारतात परत येऊन शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.