Mangesh Mahale
मद्य गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
तिहार जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीच्या ताब्यात असताना त्यांनी सरकार चालवले, पण आता जेलमधून सरकार चालवणे अवघड होईल.
ईडीच्या कोठडीत असताना त्यांना लोकांना भेटण्यासाठी वेळ मिळत होता, ते आता नेहमीच शक्य नाही.
जेलमध्ये भेट घेताना मध्ये काचेची भिंत असते. त्यामुळे गोपनीय चर्चा होणे अशक्य आहे.
ईडीची कोठडी संपल्यानंतर आता सीबीआय चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची मागणी करू शकते.
भगवद्गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी त्यांनी जेल प्रशासनाकडे मागितली.
‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड्स’ हे पुस्तकदेखील त्यांना हवं आहे.
केजरीवालांनी त्यांची औषधं आणि विशेष डाएटची मागणी केली आहे.
R.
NEXT: माफिया मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारावेळी कठोर भूमिका घेणाऱ्या IAS आर्यका अखौरी?