Pradeep Pendhare
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्तानं 'गोदा ते नर्मदा' या जलयात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
'गोदा ते नर्मदा' या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा प्रारंभ 25 एप्रिलला चोंडी (ता. जामखेड) आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून यात्रांचा प्रारंभ होईल.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल कालावधीत ही जलयात्रा होईल.
अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी , वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहेत.
चोंडी अन् त्र्यंबकेश्वर इथून सुरू झालेल्या यात्रेचा संगम शिर्डी इथं होऊन, पुढे छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गानं इंदूर 29 एप्रिलला समारोप होईल.
लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण आणि जलसंवर्धन, शेतीपूरक विकास, स्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे.
अहिल्यादेवींनी हे तत्त्व 250-300 वर्षांपूर्वी आचरणात आणून गरीब, वंचित, शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवलं. या जलयात्रेतून तोच जागर केला जाणार आहे.
स्मारक नाणे व टपाल तिकीट प्रकाशन, महिला सक्षमीकरण, सुशासन व वारसा संवर्धनाशी निगडित उपक्रम, प्रदर्शने, प्रकाशने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर आयोजन केले आहे.