Roshan More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर त्यांच्या प्रमुख मागणी फडणवीसांनी मान्य केली आहे. त्यासंदर्भात जीआर निघाला आहे.
मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रमाणे सर्व शैक्षणिक योजना करण्यात आल्या आहेत.चालू शैक्षणिक वर्षात मराठा समाजाला या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाला आठ योजनांचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आता दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्त मिळणार आहे. 9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती
विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्काची थेट शासनाकडून प्रतिपूर्ती, आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्रतिपूर्ती,
सारथी संस्थेमार्फेत चालक-वाहक प्रशिक्षण व रोजगार संधी
कॅपनंतर रिक्त राहिलेल्या किंवा संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश घेणाऱ्याविद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलत
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीत कोण अपात्र ठरणार? घ्या जाणून