Akshay Sabale
अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा झाल्यानं सर्वांचेच आभारी आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत म्हटलं. त्याच्या भाषणातील काही मुद्दे जाणून घेऊया...
वारंवार सरकार पडेल, असं बोललं गेलं. पण, आज सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली.
सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार काही पडलं नाही. कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे पडले.
आम्ही केलेल्या उठावाला 2 वर्षे पूर्ण झाली. जनमत पायदळी तुडवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून सरकार काम करत आहे. आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन काम केलं.
आमची जबाबदारी सर्व महाराष्ट्र आहे. काहींसाठी फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी, असं आहे.
आमचं सरकार शब्द पाळणार आहे, पळणारे नाही. इच्छा असेल तर मार्ग दिसणार.
महाविकास आघाडीपेक्षा शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारनं मोठे निर्णय घेतले.