Pradeep Pendhare
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचं महावितरण लक्ष आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यात महत्त्वाची ठरत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 12 लाख 82हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा होत आहे.
दररोज 4779 मेगावाॅट विजेचा पुरवठा उपलब्ध होत, असल्याने शेतकऱ्यांना रात्री कृषिपंप चालवण्याच्या संकटातून सुटका मिळाली आहे.
राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट महावितरणने ठेवलं आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16 हजार मेगावॉट क्षमतेचे विक्रेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
आतापर्यंत 3187 कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात आले असून, राज्यातील तब्बल 12 लाख 82 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा होत आहे.
या योजनेमुळे 65 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 70 हजारांवर ग्रामीण रोजगारनिर्मिती सुरू झाले आहेत.
महावितरणच्या वीज खरेदीमध्ये 10 हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये 13 हजार 500 कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीशिवाय मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 9,17,587 कृषिपंप उपलब्ध करून दिले आहेत.
देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण ऑफ ग्रीड सौर कृषिपंपांपैकी 64 टक्के कृषिपंप एकट्या महाराष्ट्रात बसविण्यात आल्याचे महवितरणने म्हटले आहे.