Pradeep Pendhare
मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी एखाद्या माॅलमध्ये होणाऱ्या गर्दीप्रमाणे मंत्रालयात गर्दी होते.
मंत्र्यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही मंत्रालयात त्यांच्या गाडीतून किंवा त्यांच्या मागोमाग मंत्रालयात शिरतात.
मंत्रालयातील गर्दी, बैठकीच्या सभागृहाबाहेरील झुंबड रोखण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाईल, असे निर्देश मुख्य सचिवांनी प्रत्येक विभागांना दिले आहेत.
मंत्रालयात विनाकारण होणारी गर्दीतून कामकाजांना अडथळा होतो, तो टाळण्यासाठी हे नियम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंत्रालयातील मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यं प्रवेश असणार आहे.
बैठकीला उपस्थित राहायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार असून, तशी कागदपत्रांद्वारे परवानगी आवश्यक असणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक जर सह्याद्री राज्य अतिथीगृहात असेल, तर फक्त आमदार अन् खासदारांना प्रतीक्षा खोलीत प्रवेश असणार आहे.
बैठक सुरू असताना, आमदार अन् खासदारांना स्वीय सहायक यांना बैठकीच्या परिसरात प्रवेश नसणार आहे.
बैठकाआधी दोन तास मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृह आणि सातव्या मजल्यावर कोणीही बैठक आयोजित करता येणार नाही.