Jagdish Patil
मुंबई सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.
मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आज सोमवारी (ता. 10 जून) रोजी खुला करण्यात आला.
मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली प्रवास अवघ्या 8 मिनिटात होणार.
कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच बोगद्यातून विंटेज कारमधून प्रवास करीत पाहणी केली.
तर सध्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल, अशी माहिती CM शिंदेंनी दिली.
तसंच हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार.