Jagdish Patil
आगामी काळात भाजपला टक्कर देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे ६० आमदार ममता बॅनर्जींपासून लांब गेले आहेत.
तर लोकसभेतील २० खासदारांनी 'NDA'ला साथ दिली. त्यामुळे TMC देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले आणि सध्या राजकारणात सक्रिय असलेले पक्ष कोणते ते जाणून घेऊया.
ममता बॅनर्जी यांचा TMC पक्षाचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी याआधी हा पक्ष बंगालमधील सत्ताधारी पक्ष होता.
अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसमधून बाहेर पडून ममता बॅनर्जींनी 1998 साली TMCची स्थापना केली होती.
सोनिया गांधींच्या परदेशी मूळ असण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापन केली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-SP) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) असे दोन भाग या पक्षाचे झालेत.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डींच्या निधनानंतर, त्यांचे सुपुत्र जगनमोहन रेड्डींनी काँग्रेस पक्ष सोडला आणि वाय. एस. आर. काँग्रेसची स्थापना केली.
माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून 1999 मध्ये JKPDP पक्षाची स्थापना केली.
तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेतृत्वाच्या निर्णयांवर नाराज होऊन जी. के. मूपनार यांनी 1996 ला तमिळ मानिला काँग्रेसची स्थापना केली होती.
पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगसामी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून 2011 साली या AINRC ची स्थापना केली