Rashmi Mane
देशभरात येत्या 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार असून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात यंदाही उत्साहाचे वातावरण असणार आहे.
"गोंविदा रे गोपाळा","अरे बोल बजरंग बली की जय”च्या घोषात बालगोपाल मानवी पिरॅमिड रचून मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील वर्तकनगर शाळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या या मानाच्या हंडीची 2012 मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली होती.
भाजपचे आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने होणारी ही दहीहंडी मुंबईतील सर्वांत लक्षवेधी मानली जाते. अनेक मान्यवर पथकांना खास आमंत्रण दिले जाते आणि इथे बघ्यांची मोठी गर्दी जमते.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारली जाणारी ‘दिघे साहेबांची मानाची हंडी’ ठाण्यात विशेष प्रसिद्ध आहे. ही हंडी ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी यंदा पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठी दहीहंडी उभारण्याचा दावा केला आहे. बक्षीस रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.
ठाण्यातील मानाची दहिहंडी म्हणजे पाचपाखाडी येथील जितेंद्र आव्हाडांनी आयोजित केलेली हंडी. या दहिहंडीने जगभरात नावलौकीक मिळवले आहे. 'संघर्ष' प्रतिष्ठानच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड ही हंडी उभारतात.