Roshan More
'दांडी यात्रा' ही भारतीय स्वातंत्र्या संग्रामातील महत्त्वपूर्ण घटना आहे. हा मिठा साठीचा सत्याग्रह अहिंसात्मक मार्गाने ब्रिटीशांविरोधात उभारलेला सर्वात मोठा लढा होता. या लढ्याला 96 वर्ष झाली आहेत.
या यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 झाली. महात्मा गांधी आणि त्यांचे 78 अनुयायी साबरमती आश्रमातून निघाले. तब्बल 24 दिवस ही यात्रा चालली.
बलाढ्या ब्रिटीश सम्राजविरोधातील दांडी यात्रा अहिंसात्मक लढ्याचे प्रतिक बनले.
दांडी यात्रेत 240 मैल म्हणजे 386 किलोमीटरचा पायी प्रवास केला.
सहा एप्रिलला ही यात्रा दांडी समुद्र किनारी पोहोचली. समुद्र किनारी मीठ उचलून सविनय कायदेभंग करण्यात आला.
पंडित नेहरु हे देखील या यात्रेच्या सुरुवातील सहभागी झाले होते. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यावर आंदोलनाच्या जबाबदारी असल्याने ते यात्रेमध्ये सहभागी झाले नव्हते.
दांडी यात्रेतून असहकार चळवळ सुरू करून गांधींनी ब्रिटीश सत्तेला हादरा दिला.