सरकारनामा ब्यूरो
अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगणारे सिकंदर बख्त यांचा जन्म 1918 मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता.
शाळेच्या दिवसांत हॉकी खेळणारे सिकंदर यांनी दिल्लीच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून शिक्षण घेतले.
1945 पर्यंत भारत सरकारच्या पुरवठा विभागात त्यांनी क्लार्क म्हणून काम केले.
1952 मध्ये त्यांनी एमसीडी (Municipal Corporation of Delhi) निवडणुकीत काँग्रेसकडून विजय मिळवला होता.
कालांतराने जनता पक्षात गेल्यानंतर त्यांनी पक्षाच्या तिकिटावर चांदणी चौकातून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.
मोरारजी देसाई यांचे सरकार स्थापन झाले आणि सिकंदर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.
आणीबाणीच्या काळात ते अटलबिहारी वाजपेयी यांचे चांगले मित्र झाले. भाजपच्या स्थापनेनंतर त्यांना पक्षाचे सरचिटणीस अन् नंतर उपाध्यक्षही बनवण्यात आले.
2000 मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी 'पद्मविभूषण' पुरस्कार मिळाला. त्यानंतर ते केरळचे राज्यपाल झाले.
R