Ganesh Sonawane
नसरापूरच्या घटनेतील नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
पण नुसतं 'फाशी द्या' असं न म्हणता, 'मरेपर्यंत' हा शब्द जोडण्यामागचं मुख्य कारण काय? जाणून घेऊ
ब्रिटीश किंवा जुन्या काळात जेव्हा गुन्हेगाराला फाशी दिली जायची, तेव्हा काही वेळा अपघाताने किंवा तांत्रिक कारणामुळे फाशीची दोरी तुटायची किंवा फासावर लटकवल्यानंतरही गुन्हेगाराचा जीव वाचायचा तो मरत नव्हता.
अशावेळी गुन्हेगाराचे वकील कोर्टात असा युक्तिवाद करायचे की, 'कोर्टाने फक्त फाशी देण्याची शिक्षा दिली होती, ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आता माझा अशील (क्लायंट) वाचला हा देवाचा चमत्कार आहे, त्यामुळे त्याला पुन्हा फासावर चढवता येणार नाही असा युक्तिवाद वकिल करत.
कायद्यातील याच पळवाटेचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार वाचायचे आणि हीच कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला.
CRPC च्या कलम ३५४ (५) नुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली जाते, तेव्हा आदेशात स्पष्ट लिहावं लागतं की, त्या व्यक्तीला मानेला फाशी देऊन तो मृत होईपर्यंत लटकवून ठेवण्यात यावे.
कारण हा न्यायालयाचा अंतिम आदेश असतो ज्यामध्ये कोणत्याही चमत्काराला जागा उरत नाही. तो मरत नाही तोपर्यंत त्याला फाशी दिली जाते.