Jagdish Patil
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, सीमा लढ्यातील धडाडीचे नेते दीपक दळवी यांचं आज (ता.17) निधन झालं.
ते मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत यासाठी त्यांनी मोठा लढा दिला.
84 वर्षीय दळवी यांच्या निधनाने बेळगावसह सीमाभागावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्याचा बुलंद आवाज हरपल्याची भावना सीमावासियांतून व्यक्त होत आहे.
आयुष्यातील 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सीमा लढ्यासाठी दिला. या लढ्यात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला.
कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली.
डिसेंबर 2021 मध्ये बेळगावमध्ये त्यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती 'काळा दिवस' पाळते. या आंदोलनांचे नेतृत्व अनेक वर्षे दळवींनी केलं.