Rashmi Mane
1958 - संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीत मोर्चा. पोलिसांनी रोखल्याने पंधराशे सत्याग्रहींनी संसद भवनापुढे ठाण मांडले.
1961 - पोर्तुगीजांविरुद्धच्या लढा अंतीम टप्प्यात. भारतीय सैन्याची जोरदार चढाई. पोर्तुगीज सैनिकांचे लढा न देताच पलायन.
1977 - आणिबाणीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी. तत्कालिन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा दिला.
1995 - अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या अथक प्रयत्नाबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे यांना जाहीर.
1997 - भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. अधिकाऱ्यांना असलेले संरक्षण काढले.
1997 - तामिळनाडूत अण्णा द्रमुक पक्षाबरोबर केलेल्या निवडणूक समझोत्यावर टीका करत गांधी कुटुंबियांचे निकटवर्ती मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसबरोबर संबंध तोडल्याची घोषणा केली. अय्यर यांचे ए मॅव्हेरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
1999 - श्रीलंकेच्या अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांच्या निवडणूक प्रचार सभेत स्फोट
2002 - संसदेवरच्या हल्ल्या प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने अफजल गुरु, अब्दुल गिलानी आणि शौकत गुरु यांना फाशीची शिक्षा सुनावली.
2006 - संयुक्त अमिरातीमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या.