Rashmi Mane
1955 - वृत्तपत्रीय कागद तयार करणाऱ्या नेपानगर कागद गिरणीतील उत्पादन सुरू. तोपर्यंत भारतीय वृत्तपत्रे सर्वस्वी परदेशी कागदावर अवलंबून होती.
1966 - भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन. त्यांना मरणोत्तर "भारतरत्न' सन्मानाने गौरविण्यात आले होते.
1966 - लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांची नेमणूक
1972 - पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण. त्या आधी झालेल्या लढाईत भारताने पाकिस्तानचा सपाटून पराभव केला होता.
1982 - प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजमोहन बिर्ला यांचे निधन.
1999 - कमाल जमीन धारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारने जारी केला.
2000 - छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
2000 - WTOच्या अटींनुसार भारत व अमेरिकेत करात. कृषी, वस्त्रोद्योगासह अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील १४०० वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठविण्याचा भारत सरकारचा निर्णय