Rashmi Mane
1943- पुण्याच्या कॅपिटॉल चित्रपटगृहात बाबुराव चव्हाण, बापू साळवी, एस. टी. कुलकर्णी आणि भास्कर कर्णिक या चार क्रांतीवीरांनी बाँबस्फोट घडवला. त्यात ४ इंग्रज अधिकारी ठार झाले होते. ही इमारत आता व्हिक्टरी या नावाने ओळखली जाते.
1950 - भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांची निवड. याच दिवशी "जन गण मन' हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.
1962 - विशिष्ट माध्यम लावण्याचा गुजरात विद्यापीठास अधिकार नाही, असा गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय. गुजराती माध्यमाची सक्ती करणारा कायदा रद्द.
1965 - दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे शिल्पकार व माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचे निधन.
1966 - एअर इंडियाचे "कांचनगंगा' विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळले. या अपघातात भारतातील अणू विज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी भाभा यांचे निधन झाले.
1998 - प्रजासत्ताकदिनी आणि निवडणूक प्रचारादरम्यान घातपाती कारवाया घडवून आणण्याकरिता पाकिस्तानातील सात जणांनी 45 दिवस भारतीय सीमेच्या आतील भागात भुयार खणल्याचे उघडकीस आले. हे भुयार 55 मीटर लांब आणि पाऊण मीटर रुंद होते.
2002 - तिसऱ्या पिढीतील इन्सॅट-3 सी या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरु अवकाशतळावरुन एरिअन-4 या उपग्रहवाहकाद्वारे यशस्वी प्रक्षेपण.