Pradeep Pendhare
शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभा करणारा पहिला तत्त्वचिंतक, म्हणजे महात्मा जोतिबा फुले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जोतिबांना बुद्ध अन् कबीर यांच्या पंक्तीत आपले गुरू बनवले. ते दोघे एकमेकांना कधीच भेटले नाही.
जोतिबा फुले 1890 साली निर्वाण पावले, तर 1891 झाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. तरी एकमेकांना कधीच न भेटलेल्या गुरू-शिष्यात पराकोटीची वैचारिक समानता होती.
डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिक पाणवठ्यावर नागरी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी 1920च्या दशकात महाडचा रणसंग्राम सुरू केला, त्याची पूर्वपिटिका जोतिबा फुले यांनीच होती.
जोतिबांनी 1868 साली सनातन्यांच्या शिव्य- शापाला न भिता आपल्या घराजवळील पाण्याचा हौद महार मांगासाठी खुला केला.
जोतिबा फुले यांनी मनुस्मृती ही शूद्राच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून, तिला अपवित्र ठरवत तिचा धिक्कार केला. तीच मनुस्मृती डॉ. आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात जाळली.
"जोतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वी कधीच लाज वाटली नाही. मीच तेवढा खरा जोतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे," असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.
जोतिबांच्या धर्मचिकित्सा, शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांची उन्नती आणि त्यांचे नागरी अधिकार व लोकशाहीच्या व्यापक विस्तारासाठी डॉ. आंबेडकर संघर्ष करत राहिले.
आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले' चित्रपट बनवला, तेव्हा हा चित्रपट पाहताना फुल्यांचे कार्य अन् त्याग आठवून आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आले होते.