सरकारनामा ब्यूरो
देशात मद्यप्रमाण करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढत चालल्या आहेत.
राज्यासह देशभरात गाजलेल्या कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.
राज्यात आता मद्यप्राशन पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा मोठा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
राज्यात मद्यप्राशन करून गाडी चालवल्यास आता वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
महाराष्ट्रात मद्यप्राशन करण्यास 25 वर्षांपर्यंत बंदी आहे. तर, काही राज्यात मद्यप्राशन करण्याचे वय वेगवेगळे आहे.
व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल आणि ब्रेथ अनालायझरद्वारे ठरावित मर्यादेपेक्षा जास्त अल्कोहल सेवन केल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 नुसार भारतात मद्यपान करून गाडी चालवणे हा एक फौजदारी गुन्हा आहे.
कोणतीही व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी लावताना पकडल्यास 2 हजार रुपयाचे चलन आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा पकडल्यास 3 हजारांचा दंड आणि 2 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.