Pradeep Pendhare
सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे, असं मोठं विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं.
रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू आहे. भारता शेजारील बांग्लादेश, पाकिस्तानमधील परिस्थितीही नाजूक असून चिंता वाढवणारी आहे.
उत्तरकडील राज्यांमध्ये शांतता आणि स्थिरता टिकवण्यासाठी सीमेवरील आणि शेजारील देशांचे विश्लेषणाच्या सूचना
मजबूत राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याकडे पारंपरिक आणि अत्याधुनिक, अशी मिश्र युद्धजन्य उपकरणे असणे आवश्यक आहेत.
लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापरावर भर देण्याच्या सूचना केल्या.
आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अंतराळ व इलेक्ट्रॉनिक युद्धातील क्षमता वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं.
लखनऊ इथल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले राजनाथ सिंह यांनी शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांना युद्धासाठी तयार राहण्याची गरज असल्याचं म्हटलं.