Pradeep Pendhare
बँक फसवणूक प्रकरणात ईडीनं रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची 3034 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.
या ताज्या कारवाईत, आतापर्यंत रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची (RAAG) एकूण मालमत्तेचा जप्तीचा आकडा 19344 कोटी रुपयांच्या पार गेला आहे.
ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (PMLA), 2002च्या कलम 5 अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही जप्तीची कारवाई केली आहे.
मुंबईतील उषा किरण बिल्डिंग, एक लक्झरी फ्लॅट, खंडाळा (पुणे) इथला फार्महाऊस आणि साणंद, अहमदाबाद इथल्या जमिनीचा मोठा भागाचा जप्तीत समावेश आहे.
'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'चे 7.71 कोटी शेअर्स जप्तीत समाविष्ट आहेत. हे शेअर्स 'राइजई इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड'कडे होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि भारतीय जीवन विमा निगम (LIC) यांच्या तक्रारींच्या आधारे ईडीची चौकशी सुरू आहे.
RCOM आणि समूहाच्या इतर कंपन्यांनी देशांतर्गत आणि परदेशी बँकांकडून मोठं कर्ज घेतले होतं. सध्या त्यांच्यावर एकूण 40,185 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या मालमत्तेचा वापर, ज्या बँकांचा पैसा बुडालाय त्यांचं कर्ज फेडण्यासाठी नाही, तर अनिल अंबानींच्या कुटुंबाला स्वतःच्या फायद्यासाठी करायचा होता.
पीएमएलएच्या कलम 8 अंतर्गत, संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर जप्त केलेली मालमत्ता, त्या वैध दावेदारांना परत केली जाईल ज्यांचं नुकसान झालं आहे.