Pradeep Pendhare
वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल वापराच्या फाईलवर स्वाक्षरी केल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.
लवकरच मोटारसायकल कंपन्याही इथेनॉलवरील तीन, दुचाकी बाजारात येणार आहेत.
मारुती कंपनीने 100 टक्के इथेनॉलवर चालणारी पहिली गाडी आणल्याची नितीन गडकरी यांची माहिती.
याशिवाय लवकरच एमजी हेक्टर, टोयोटा यांसारख्या मोठ्या कंपन्याही 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सादर करणार आहेत.
इथेनॉलबाबत बाजारात अपप्रचार केला जात असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.
नागपूरमध्ये हायड्रोजन पंप उभारण्यात येणार असून, तीन महिन्यांत हायड्रोजनवर चालणाऱ्या दोन बस नागपूरच्या रस्त्यावर धावणार आहेत.
इथेनॉलच्या कमी किमतीमुळे प्रवासाचा खर्च प्रतिलिटर अंदाजे ₹25 पर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
देशातील इंधन आयातीवर खर्च होणारे लाखो कोटी रुपये वाचवून, हा निधी थेट ऊस आणि मका पिकवणाऱ्या देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नितीन गडकरींचा मुख्य उद्देश आहे.
सध्या देशात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) उपलब्ध असून, भारत आता टप्प्याटप्प्याने 100 टक्के इथेनॉलच्या (E100) युगात प्रवेश करत आहे.