Rashmi Mane
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक संकटांचा सामना करत त्यांनी नेतृत्व कौशल्य दाखवलं.
फडणवीस यांच्या आयुष्यात मोठा वैयक्तिक आघात झाला. त्यांच्या वडिलांचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले.
फडणवीसांनी संकल्प केला की, नागपूरसारख्या मध्य भारतातील प्रमुख शहरात जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार केंद्र असावे.
या निर्धारातूनच ‘इंटरनॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूट, नागपूर’ या संस्थेची कल्पना साकार झाली.
आपल्या जिवलग सहकारी शैलेश जोगळेकर यांच्या सहकार्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.
आज ही संस्था केवळ नागपूरच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ व मध्य भारतातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
ही कथा वैयक्तिक दु:खाला सामाजिक उदात्तीकरणात रूपांतरित करणाऱ्या नेतृत्वाची संवेदनशील आणि दूरदर्शी राजकीय दृष्टिकोनाची आहे.