Rashmi Mane
सरकारनं सादर केलं नवीन टॅक्स बिल; जाणून घ्या काय बदललंय आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल.
भारत सरकारने सादर केलेले "नवीन आयकर विधेयक 2025" सहा दशकांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कर प्रणालीत क्रांतिकारी बदल घडवणार आहे.
5.12 लाख शब्दांच्या जुन्या कायद्याच्या तुलनेत हे नवीन विधेयक फक्त 2.6 लाख शब्दांत तयार करण्यात आला आहे. धारांच्या संख्येत 819 वरून 536 वर आणि प्रकरणांची संख्या 47 वरून 23 वर आणण्यात आली आहे.
1,200 कलमं आणि 900 स्पष्टीकरणं हटवण्यात आली असून, त्याऐवजी सोप्या भाषेतील नियम आणि 57 सारांश देण्यात आले आहेत.
सोपी आणि स्पष्ट भाषा सर्वसामान्य करदात्याला कायदा समजण्यासाठी आता वकीलाची गरज भासणार नाही. जटिल कलमं वगळल्यामुळे कोर्टात जाण्याची गरज कमी होईल. TDS, TCS आणि NGOs संदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत.
21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या अधिवेशनात यावर चर्चा होईल आणि मंजुरी मिळाल्यास हे कायदा म्हणून लागू होईल.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, "हा कायदा कर व्यवस्थेत निश्चितता आणेल आणि प्रामाणिक करदात्यांचे जीवन सुलभ करेल. हे भारताच्या कर इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल."
केवळ कायद्यात बदल नाही, तर देशातील आर्थिक व्यवहार सुलभ करण्याचा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.