M S Swaminathan : भारतीय हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामिनाथन यांना मरणोत्तर 'भारतरत्न'

Amol Sutar

योगदान

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिलं आहे.

M S Swaminathan | Sarkarnama

भारतरत्न  

त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. 

M S Swaminathan | Sarkarnama

गव्हाचे वाण

स्वामिनाथन हे आपल्या देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रथम गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले आणि त्या वाणांची शेतकर्‍यांना ओळख करून दिली.

Wheat farming | Sarkarnama

कैवारी

त्यांना शेतकर्‍यांचा कैवारी देखील म्हटले जाते. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना मिळाले आहे.

Wheat farming | Sarkarnama

हरितक्रांती

भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली.

Rice farming | Sarkarnama

मोदींचे ट्विट

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 

M S Swaminathan | Sarkarnama

दुष्काळ

1960 च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी त्यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे HYV बियाणे विकसित केले.

Drought | Sarkarnama

तामिळनाडू

त्यांचे पूर्ण नाव मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन असून यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला.

M S Swaminathan | Sarkarnama

IPS

UPSC परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेत IPS पदासाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी ते सोडून कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.

M S Swaminathan | Sarkarnama

NEXT : IPS C.V. Anand: उत्तम खेळाडू अन् कर्तबगार अधिकारी सी. व्ही. आनंद