सरकारनामा ब्यूरो
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.
त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमधील बुलसार जिल्ह्यातील भादेली गावात झाला.
मुंबई येथून विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी बारा वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.
महात्मा गांधींनी सुरु केलेल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी त्यांनी अधिकारीपदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री म्हणून सामील झाल्यानंतर त्यांनी वित्त खात्याचा कार्यभार स्वीकारला.
आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 10 वर्षे अर्थसंकल्प सादर केला आहे.
याचबरोबर त्यांनी दोनवेळा अंतरिम अर्थसंकल्पही मांडले आहेत.
अर्थमंत्री पदावर सहावेळा आणि उपपंतप्रधान असताना चारवेळा असे एकूण 10 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
गुजरातमधील सुरत मतदारसंघातून लोकसभेवर निवडले गेल्यानंतर 1977 मध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.