Rashmi Mane
आणीबाणीचा निर्णय दिल्ली आणि गुजरातेत विरोधात झळकला, पण मुंबईने त्याला कलात्मक आणि वैचारिक चपराक दिली!
चित्रपट, नाटकं, साहित्य – सगळीकडून सरकारच्या दडपशाहीला प्रत्युत्तर. "आंधी", "किस्सा कुर्सी का" यांसारखी कलाकृती सरकारविरोधी आवाज ठरल्या.
कराड येथे साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी आणीबाणीविरोधी अध्यक्षीय भाषण करून जणू महाराष्ट्राचा आवाज ठरवला.
मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता यांसारख्या महिलांनी इंदिरा गांधींच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली.
भिन्न विचारसरणीचे पण लोकशाहीसाठी लढणारे समाजवादी व संघ एकत्र आले. जॉर्ज फर्नांडिस यांचे नेतृत्व झळकले.
नाशिक, येरवडा तुरुंग हे विचारमंथनाची केंद्रे बनली. बाळासाहेब देवरस, कुमार सप्तर्षी, सुधीर जोगळेकर यांचा लढा प्रेरणादायी ठरला.
तुरुंग ही फक्त शिक्षा नसून विचारांची पाठशाळा ठरली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची याच काळात संघटनेतली घडण झाली.