Bharat Ratna Award : आतापर्यंत किती पंतप्रधानांना मिळाला 'भारतरत्न' सन्मान? एकाच कुटुंबात 3, तर एक शेतकऱ्यांचे कैवारी...

Jagdish Patil

पंडित जवाहरलाल नेहरू

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना 1955 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Pandit Jawaharlal Nehru | Sarkarnama

लाल बहादूर शास्त्री

तर दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. "जय जवान, जय किसान" चा नारा देत शास्त्रीजींनी देशाला एकता आणि सशक्तीकरणाची प्रेरणा दिली.

Lal Bahadur Shastri | Sarkarnama

इंदिरा गांधी

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न देण्यात आला.

Indira Gandhi | Sarkarnama

राजीव गांधी

राजीव गांधी यांना 1991 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात नवीन उंची गाठली.

Rajiv Gandhi | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी

वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासात ऐतिहासिक पावले उचलली.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

चौधरी चरण सिंग

जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात भारताचे पंतप्रधान राहिलेल्या चौधरी चरण सिंग यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी, त्यांना 2024 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला.

Chaudhary Charan Singh | Sarkarnama

पी.व्ही नरसिंह राव

पी. व्ही नरसिंह राव यांना 2024 साली मोदी सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केलं होते. त्यांना उदारमतर भारतरत्न हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

PV Narasimha Rao | Sarkarnama

भारतरत्न

तर भारतरत्न हा नागरी सन्मान असून त्याला पदक आणि प्रतिकृती दिली जाते. तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला कोणतेही मानधन दिले जात नाही.

Bharat Ratna | Sarkarnama

NEXT : पोखरण अणुचाचणी ते 'सदा-ए-सरहद'; अटलबिहारी वाजपेयींनी घेतलेले 5 धाडसी निर्णय कोणते?

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama
क्लिक करा