Mangesh Mahale
सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि राजीनामा देण्याच्या विचारात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.1 एप्रिल 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा नियम लागू होत आहे.
कंपनी सोडल्यानंतर हक्काचा पगार, सुट्ट्यांचे पैसे आणि इतर थकबाकी मिळवण्यासाठी 3 ते 4 महिने वाट पाहावी लागते. आत्तापर्यंत नोकरी सोडल्यानंतर सेटलमेंटसाठी 45 ते 90 दिवस लागायचे.
नव्या 'कोड ऑन वेजेस' (Code on Wages) च्या कलम 17(2) नुसार नोकरी सोडल्यानंतर (शेवटचा कामकाजाच्या दिवसानंतर), कंपनीला पुढील 48 तासांच्या आत त्याचे सर्व पेमेंट करुन अकाउंट क्लोज करणे बंधनकारक आहे.
तुम्ही स्वतः राजीनामा दिला असो, कंपनीने तुम्हाला कामावरून काढले असो किंवा 'ले-ऑफ' झाला असो, हा नियम सर्वांना समान लागू असेल.
जर कंपनीने 48 तासांत पैसे दिले नाहीत, तर तो कायद्याचा भंग मानला जाईल. अशा वेळी तुम्ही कामगार विभागाकडे तक्रार करू शकता आणि उशिरा मिळालेल्या पैशांवर व्याजाची मागणीही करू शकता.
ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे.नव्या नियमानुसार, तुम्ही 1 वर्ष सेवा पूर्ण केली असेल, तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठराल. नोकरी सोडल्यानंतर 30 दिवसांच्या आत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणे अनिवार्य आहे.
पगाराच्या संरचनेत मोठा बदल नव्या कामगार कायद्यामुळे तुमच्या सॅलरी स्लीपचं स्वरूपही बदलणार आहे: बेसिक सॅलरी 50०%तुमच्या एकूण सीटीसी (CTC) पैकी किमान 50 % रक्कम ही तुमची बेसिक सॅलरी असावी लागेल.
पीएफमध्ये वाढपीएफची वजावट बेसिक सॅलरीवर अवलंबून असते. बेसिक वाढल्यामुळे तुमच्या पीएफ खात्यात दरमहा जास्त पैसे जमा होतील, जे तुमच्या निवृत्तीनंतरच्या काळासाठी फायदेशीर ठरेल.
पीएफ जास्त कापला गेल्यामुळे तुमच्या हातात येणारा मासिक पगार (Take-home salary) थोडा कमी होऊ शकतो, पण दीर्घकालीन बचतीच्या दृष्टीने हे अत्यंत फायदेशीर आहे.