Pradeep Pendhare
आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष असते. Tribal Healthcare Scheme
अनेक वर्षांपासून इथले आदिवासी बांधव आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्यांकडे जातात.
सुमारे 30 ते 40 टक्के आदिवासी बांधव आजही आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पारंपरिक पद्धतींवर विश्वास ठेवून, ते पुजारी, बाबा, महाराजांकडे जातात.
याच पुजाऱ्यांला आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना, डॉक्टरांकडे पाठवण्यासाठी आरोग्यदूत योजना आरोग्य विभाग राबवत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी दिली.
आरोग्यदूत पुजाऱ्यांना आरोग्य विभागाकडून 15 रुपये मानधन देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी पुजाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.
यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 1700 पुजाऱ्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्याबाबत जागरूकता वाढून मलेरियासारख्या आजारांवर वेळेत उपचार मिळेल आणि मृत्यूदर कमी होण्यास मदत मिळेल.
गडचिरोलीतील हा उपक्रम राज्यासाठीच नाही तर देशासाठी आदर्श ठरून, पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक वैद्यक यामध्ये समन्वय ठरू शकतो.