युनेस्को यादीत तामिळनाडूचा 'जिंजी' किल्ला ; शिवरायांनी तो कधी व कसा जिंकला?

Ganesh Sonawane

युनेस्कोचा दर्जा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.

Gingee Fort in Tamil Nadu

तामिळनाडूचा जिंजी

त्यात महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे.

Gingee Fort in Tamil Nadu

स्वराज्याची तिसरी राजधानी

या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात.

Gingee Fort in Tamil Nadu

१६७७ मध्ये जिंकला

शिवाजी महाराजांनी १६७७ मध्ये दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंजी किल्ला जिंकून घेतला.

Gingee Fort in Tamil Nadu

युद्ध न करता जिंकला

जिंजी किल्ला हा अत्यंत मजबूत आणि अभेद्य होता. तो जिंकण्यासाठी थेट लष्करी हल्ला करणे खूप कठीण होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेनं आणि रणनीतीने हा किल्ला ताब्यात घेतला असं इतिहासकार सांगतात.

Gingee Fort in Tamil Nadu

किल्लेदाराला प्रस्ताव

महाराजांनी नासिर मुहम्मदला एक प्रस्ताव दिला. त्यानुसार, त्याला ५०,००० होन (सोन्याची नाणी) रोख रक्कम आणि वार्षिक १ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश जहागीर म्हणून देण्याचे वचन दिले.

Gingee Fort in Tamil Nadu

अन् किल्ल्याचा ताबा मिळाला

नासिर मुहम्मदला लढाई नको होती आणि त्याला हा प्रस्ताव फायदेशीर वाटला. त्यामुळे त्याने हा प्रस्ताव स्वीकारला आणि जिंजी किल्ल्याचा ताबा मराठ्यांना दिला.

Gingee Fort in Tamil Nadu

राजाराम महाराजांना आश्रय

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज मोगल सैन्याला हुलकावणी देत १६८९ मध्ये जिंजीला पोहोचले. पुढचे ९ वर्ष याच किल्ल्याने त्यांना आश्रय दिला.

Gingee Fort in Tamil Nadu

मुघलांचा वेढा

त्यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजी किल्ल्याला वेढा घातला. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

Gingee Fort in Tamil Nadu

NEXT : युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश, पण याचा नेमका फायदा काय? जाणून घ्या

Shivaji Maharaj's 12 forts gain UNESCO World Heritage tag | Sarkarnama
येथे क्लिक करा