Aslam Shanedivan
शेतीच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांना दिला जातो.
आता या महाडीबीटीच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
शेतीतील कामांदरम्यान होणाऱ्या अपघातांत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले
यापूर्वी सुरक्षा सानुग्रह योजनेसाठी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे.
सरकार 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत असून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये देते.
तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत शेतकरी किंवा वारसदारांना करते.
पूर्वी या योजनेसाठी शेतकरी व वारसदारांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव व कागदपत्रे सादर करावी लागत; त्रुटी किंवा विलंब झाल्यास अनुदान मिळत नसे.
आता अर्जप्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन झाल्याने शेतकऱ्यांना कार्यालयांचे फेरफटके टळून त्रुटी त्वरित दुरुस्त करता येतील; सन 2025-26 साठी 120 कोटींची तरतूद आहे.