Jagdish Patil
दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून नवा वाद सुरू झाला आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे.
या वादामुळे पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे चर्चेत आले असून त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
ज्येष्ठ कामगार नेते, कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक अशी कॉ. गोविंद पानसरे यांची ओळख आहे.
ते अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावातून कोल्हापुरात शिक्षणासाठी आले.
कोल्हापुरात आल्यानंतर शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून त्यांनी सुरुवातीला पेपर विकण्याचं काम केलं.
इथेच त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. तसंच शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे.
ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात विविध पदांवर कार्यरत होते. तसंच ते कामगार, शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय असायचे.
पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिलं.
त्यांचं पुस्तक अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. पुस्तकात शिवरायांचा उल्लेख एकेरी असल्याचा आक्षेप घेतला जातो.
दरम्यान, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर गोळीबार झाला.
या हल्ल्यातून उमाताई बचावल्या मात्र गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरेंचं उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 मुंबईत निधन झालं.