सरकारनामा ब्यूरो
राजस्थानच्या मेवाड येथील सिसोदिया राजघराण्यात महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता. ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांना क्राउन प्रिन्स ही पदवी देण्यात आली होती.
वयाच्या 32 व्या वर्षी मेवाडचे महाराणा म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
महाराणा प्रताप हे कुशल प्रशासक आणि योद्धा होते. मुघलांचे सततचे हल्ले आणि शत्रुत्व असतानाही त्यांनी संयमाने विजय मिळवले.
गोगुंडाजवळील एका अरुंद डोंगराच्या खिंडीत महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबराच्या सैन्यादरम्यान हल्दीघाटीची प्रसिद्ध लढाई झाली.
हल्दीघाटीच्या लढाईनंतर मेवाडचा प्रदेश मोठ्या प्रमाणावर मुघलांच्या ताब्यात होता. अकबर लाहोरला गेल्यानंतर महाराणा यांनी त्या भागातील मुघल सैन्याचा पराभव केला.
महाराणा प्रतापांच्या ताब्यात असलेल्या चित्तोडगडला अकबराच्या सैन्याने अनेक महिने वेढा घातला होता. मात्र महाराणा यांच्या सैन्याने अतुट धैर्याने किल्ल्याचे रक्षण केले.
ही लढाई महाराणा प्रताप यांच्या लष्करी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा संघर्ष होता. लष्करी पराक्रमाचे अन् राज्याचे रक्षण करण्याची त्यांची बांधिलकी यातून दिसून आली.
मुघलांचे संयुक्त सैन्य, मेवाडचे शासक राजा उदय सिंह आणि महाराणा प्रताप यांच्यातील या लढाईत त्यांनी आपली कौशल्य आणि नेतृत्व क्षमता दाखवून दिली.
महाराणा प्रताप आणि आसफ खानच्या लढाईत महाराणांंची सैन्य संख्या कमी असूनही मुघलांशी जोरदार लढा देत त्यांनी विजय मिळवला.