Roshan More
महाराष्ट्रातील सर्व सेवाभरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत.
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष असतील; पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समितीत समावेश.
ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून अहवाल तयार करणार.
केंद्राचा पेपरफुटीविरोधातील कठोर कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी येत्या पंधरवड्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश.
परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यात २५,००० सुरक्षित क्लासरुम उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी समन्वय साधणार.
बैठकीत इतर देशांमधील परीक्षा पद्धती, सध्याची प्रक्रिया आणि त्यातील संभाव्य सुधारणांवर सविस्तर चर्चा.
ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा पहिल्याच पोस्टिंगमध्ये कारनामा; थेट 1 कोटींची लाच, कोण आहेत राहुल बन्सल?