Aslam Shanedivan
देशात सध्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असून आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात निवडणूक लागली आहे. त्यात कोण विजयी होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांची चर्चा होत आहे.
ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांना उमेदवारी देण्याची मागणी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काँग्रेसच्या एका गटाने केली होती.
मात्र 1962 साली पंडित नेहरू यांनी विजयालक्ष्मी यांच्या ऐवजी बिहारचे गव्हर्नर झाकीर हुसैन यांना उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजयालक्ष्मीही नेहरूंच्या भूमिकेशी सहमत होत्या
त्यामुळे त्या निवडणुकीत झाकीर हुसैन विरूद्ध सामंतसिंह अशी लढत झाली. त्यावेळी हुसैन यांना 568 मत तर सामंतसिंह यांना 14 मते मिळाली होती.
हुसैन हे भारताचे पहिले मुस्लिम उपराष्ट्रपती बनले. पुढे 1967 मध्ये ते राष्ट्रपतीही बनले होते.