Ganesh Sonawane
कामगारांची प्रकृती चांगली राहावी आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी कायद्याने सुट्ट्या देण्यात आल्या. ही संकल्पना कामगार कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली.
तथापी सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याची भरपाई अर्थात ज्याला आपण कॉम्प ऑफ म्हणतो तो देण्याची तरतूद सुरुवातीला नव्हती.
एखाद्या कामगाराने सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याची भरपाई करण्याची तरतूद करण्यासाठी १ नोव्हेंबर १९४४ रोजी फॅक्टरीज अॅक्ट (दुसरी सुधारणा) विधेयकावर केंद्रीय विधिमंडळात झालेल्या चर्चेला मजूर मंत्री या नात्याने डॉ. बाबासाहेबांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले.
या विधेयकातील दुसरी तरतूद पगारी रजेबद्दल होती.
याशिवाय बारमाही चालणाऱ्या कारखान्यासाठी आठवड्यात कामांच्या तासांची कमाल मर्यादा ४८ आणि हंगामी कारखान्यासाठी ५४ तासांची मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते.
त्या वेळच्या फॅक्टरीज कायद्यात 'ओव्हर टाइम'च्या वेतनाबाबत सर्वत्र सारखा नियम नव्हता.
म्हणून कोणत्याही प्रकारचा कारखाना असो 'ओव्हर टाइम'च्या वेतनाबाबत सर्वत्र सारखा नियम असावा यासाठी वेतनाचा दर दीडपट असावा अशी सुधारणा सुचवली.
वरील दोन्ही प्रमुख सुधारणा सुचवणारा फॅक्टरीज अॅक्ट १९३४ (सुधारणा) विधेयक २१ फेब्रुवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय विधिमंडळात सादर केला. (संदर्भ - लोकराज्य अंकातील भि. म. कौसल यांचा लेख)