Deepak Kulkarni
भारताची ओळख इतिहासात 'सोने की चिड़िया' अशीच राहिली आहे. कारण आपल्या देशात प्रचंड सोनं होतं.
भारताला सोन्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. प्राचीन काळापासून राजघराणं, मंदिरं, विविध संस्थानं यांच्याकडे प्रचंड सोनं होतं. भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
भारतातील लोकांना सोन्याविषयी एक आकर्षण राहिलं आहे. भारतामध्ये सोन्याचा उपयोग केवळ सजावटच नाही, तर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी देखील केला जातो. सध्या तर सोन्याकडे एक उत्तम गुंतवणुक म्हणूनही पाहिले जाते.
भारतीय लोकं सण-उत्सव, लग्न समारंभ, शुभमुहूर्त यांसारख्या प्रसंगावर आवर्जून सोने खरेदीला प्राधान्य देतात. याचसंदर्भात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल सादर केला आहे.
यानुसार भारतात सध्या घरे आणि मंदिरांत जवळपास 25 हजार टन सोनं असल्याची माहिती समोर येत आहे.
आपल्या देशात घर आणि मंदिरात मिळून जितकं सोनं आहे, त्याचं एकूण मूल्य 2.4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आपल्या देशातील सोन्याची किंमत आजमितीला पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट अधिक आहे.
सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे.
भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे.