Ganesh Sonawane
विजयासाठी उमेदवाराला किमान किती मते आवश्यक आहेत, याला 'विजयी कोटा' म्हणतात.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सिंगल ट्रान्सफरेबल वोट (STV) पद्धतीने मतदान व मतमोजणी होते.
एकूण वैध मते भागीले जेवढ्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागाकार केल्यावर येणाऱ्या संख्येत. एक अधिक केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो
कोटा = (एकूण वैध मते ÷ (जागा + 1)) + 1
नाशिकच्या निवडणुकीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन हा विषय समजून घेऊ. नाशिकध्ये एकूण वैध मते 618 आहेत. आणि विधानपरिषदेची जागा 1 आहे.
618 ÷ 2 = 309
309 + 1 = 310
म्हणून विजयासाठी 310 मते आवश्यक आहेत.
मतदार उमेदवारांना 1, 2, 3 असा पसंतीक्रम देतात. प्रथम पसंतीची मते निर्णायक ठरतात.
पहिल्या फेरीत सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो. त्याची मते पुढील पसंतीनुसार दुसऱ्या उमेदवाराकडे हस्तांतरित होतात.
जो उमेदवार कोटा पूर्ण करतो. त्याला विजयी घोषित केलं जात.