Rashmi Mane
देशातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड आहे पण अशक्य नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका IAS अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्यांनी गलेलठ्ठ पगाराची ऑफर नाकारली आणि अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
अभिनव सिवाच यांनी दिल्लीतून बी.टेक केल्यानंतर त्यांनी आयआयएम कोलकातामधून एमबीए देखील केले. यानंतर, प्लेसमेंटद्वारे, त्याला एका खाजगी कंपनीत सुमारे 30 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळाली.
नोकरी नाकारत त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दररोज 7 ते 8 तास अभ्यास करून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात राहणारे अभिनव सिवाच त्यांच्या कार्य कर्तृत्वासाठी ओळखले जातात.
अभिनवने सांगितले की, यूपीएससीची तयारी करताना लक्ष विचलित होऊ नये यासाठी सोशल मीडिया वापरने बंद केले.
सध्या ते दक्षिण दिल्लीचे उपविभागीय जिल्हाधिकारी (एसडीएम) म्हणून कार्यरत आहेत