Rashmi Mane
संसदेत आज दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 'मत चोरी'च्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा संसद भवनातून निवडणूक आयोगाकडे निघाला होता.
बिहारमधील निवडणूक आयोगाकडून मतदार यादीची सखोल पडताळणी व्हावे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर तत्काळ चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली.
नोटिस फेटाळल्यानंतर राज्यसभेत विरोधकांचा घोषणाबाजीचा पारा चढला; कामकाज स्थगित करण्यात आले.
आयोगाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा अडवला. अखिलेश यादवसह काही खासदारांनी अडथळे ओलांडले, त्यांना व राहुल गांधी यांसह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, अखिलेश यादव, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी खासदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
परिवहन भवनाजवळ पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स उभारून मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून मोर्चा रोखला. पोलिलांनी मोर्चा अडवत असताना खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे.
अखिलेश यादव बॅरिकेड्सवर चढून रस्त्यावर बसले. महुआ मोईत्रा यांच्यासह काही खासदारांनी बॅरिकेड्स ओलांडून थेट रस्त्यावर आंदोलन केले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. खासदारांनी ‘SIR’ आणि ‘वोट चोरी’ लिहिलेल्या पांढऱ्या टोपी, पोस्टर्स, बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. SIR प्रक्रिया मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.