Rajanand More
इराण युध्दामुळे देशामध्ये इंधन तुटवडा होण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्थिती सुधारत आहे.
सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा मुबलक साठा आहे. नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याने अचानक विक्रीत आणि मागणीमध्ये वाढ झाली आहे.
देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा क्रुड इंधन उपलब्ध होणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम आशियामध्ये घडत असलेल्या घडामोडींचा पुढील काही महिने देशावर परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे देशात एलपीजीचा तुटवडाही नाही, अशी माहिती सरकारने दिली.
देशभरात दररोज ५० लाख सिलिंडरचे वितरण होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आयात कमी झाली आहे.
इंधन व एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.