Jagdish Patil
भारत सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातली असली. तरीही बेकायदेशीरपणे त्याचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
आता तर थेट लोकसभेच्या सभागृहातच ई-सिगारेट ओढल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांकडून ई-सिगारेट ओढली जात असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.
त्यांच्या या आरोपामुळे 'ई-सिगारेट'चा मुद्दा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर ई-सिगारेट म्हणजे काय आणि त्याचे धोके जाणून घेऊया.
ई-सिगारेट म्हणजे एक बॅटरीवर चालणारे इलेक्टॉनिक उपकरण आहे. आतमध्ये निकोटीनचा थर असतो. त्याचे रुपांतर वाफेमध्ये किंवा धूरामध्ये होते.
ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नसल्यामुळे त्यात राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत.
या सिगारेटच्या टोकाला LED लाईट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होतं.
ई-सिगारेट उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर देशात बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक वर्ष तुरुंगवास किंवा एक लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात
केंद्र सरकारने 2019 मध्ये ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांमध्य ई-सिगारेटचा वापर वाढल्याने त्यावर बंदी घालण्यात आली.