केंद्र सरकारचा 'WhatsApp'बरोबरच मेसेजिंग अ‍ॅप्सबाबत कडक आदेश! जाणून घ्या नियम...

Aslam Shanedivan

सायबर क्राइम

देशात सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात होत असून यावर आता भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

Cyber ​​Crime | Sarkarnama

मेसेजिंग अ‍ॅप्स

सरकारने व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अरत्ताई आणि जोश यांसारख्या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सबाबत निर्णायक पावले उचलली आहेत

Whats App | Sarkarnama

सिम कार्ड

दूरसंचार विभागाच्या (DoT) निर्देशानुसार हे मेसेजिंग अ‍ॅप्स आता कोणत्याही वापरकर्त्याला सक्रिय सिम कार्डशिवाय वापरता येणार नाही.

Sim Card | Sarkarnama

सायबर सुरक्षा

विभागाने हा आदेश दूरसंचार सायबरसुरक्षा सुधारणा नियम २०२५ अंतर्गत पहिल्यांदाच दिला असून यातून अ‍ॅप-आधारित मेसेजिंग सेवा दूरसंचार सेवांप्रमाणे नियंत्रित केल्या जातील.

Cyber security | Sarkarnama

नियम कडक

सरकारच्या या आदेशाप्रमाणे ब्राउझरद्वारे लॉग इन करणाऱ्यांसाठी नियम आणखी कडक करण्यात आले असून वापरकर्त्यांना वेब अ‍ॅपवरून दर सहा तासांनी ऑटो-लॉग आउट करावे लागेल.

Whats App | Sarkarnama

सरकारचा दावा

क्यूआर कोड स्कॅन करून पुन्हा लॉग इन करावे लागेल. तर यामुळे दूर बसून बनावट नंबर आणि निष्क्रिय सिम वापरून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसेल, असा दावा सरकारचा आहे.

PM Modi | Sarkarnama

फायदा कसा होईल

तसेच सरकारचे म्हणणे आहे की सतत सिम-बाइंडिंगमुळे वापरकर्ते, नंबर आणि डिव्हाइसेसमधील ट्रेसिंग मजबूत होईल आणि मेसेजिंगद्वारे होणारे स्पॅम, फसवणूक आणि आर्थिक गुन्हे कमी होतील.

Cyber Fraud | Sarkarnama

सेबीचा प्रस्ताव

डिजिटल पेमेंटमध्ये आधीच कडक सुरक्षा असून UPI आणि बँकिंग अ‍ॅप्सद्वारे सिम पडताळणी अनिवार्य आहे. यानंतर आता सेबीने ट्रेडिंग अकाउंट्सना सिमशी लिंक करून फेस रेकग्निशन जोडण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.

UPI | Sarkarnama

Voter ID हरवलं? काळजी नको! या 12 पुराव्यांनीही मतदान करता येणार

आणखी पाहा