Jagdish Patil
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत 5 मोठे निर्णय घेतलेत.
भारताच्या सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयानंतर संतापलेल्या पाकिस्तानने देखील थेट सिमला करार रद्द केला आहे.
पकिस्तानने रद्द केलेला सिमला करार नेमका काय आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया.
1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धानंतर 2 जुलै 1972 ला दोन्ही देशांमध्ये 'सिमला करार' झाला. या करारानंतर 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती.
या करारावर भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानकडून झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली.
भारत-पाकिस्तानमध्ये शांतता आणि द्विपक्षीय संबंध चांगले ठेवण्यासाठी हा करार करण्यात आला.
तसंच सर्व वाद आणि समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी चर्चा करून निर्णय घेऊ, कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, असंही यावेळी ठरलं.
एकमेकांविरोधात ताकदीचा वापर न करता एकमेकांच्या राजकीय स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाही, असाही ठराव दोन्ही देशांमध्ये झाला.