Pradeep Pendhare
मे महिन्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली.
15 ते 25 मे रोजी दरम्यान पेट्रोल अन् डिझेलच्या दरात एकूण जवळपास 7 ते 7.5 रुपये प्रति लिटरपर्यंतची वाढ झाली.
मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाल्याचे सरकार सांगत आहे.
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बराच काळ इंधनाच्या दरातील वाढ रोखून धरली अन् एक्साइज ड्युटी कमी करून हा भार कमी केल्याचा दावा सरकार करत होते.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्याना दररोज 1 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करत असल्याचे म्हटलं होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 मोठ्या पेट्रोलियम कंपन्यांनी जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीच्या निकालात चांगला नफा कमावल्याची नोंद केली आहे.
या तिन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या कमावलेला नफा जवळपास 19,000 कोटी रुपयांहून अधिक होता, असे सांगितले जात आहे.
यातून देशातील पेट्रोलियम कंपन्यांच्या नुकसान सहन करण्याच्या या दाव्यावर ते प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कंपन्यांनी चांगला नफा कमावला आहे, हे कसे? असा प्रश्न होत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांचे तिमाही निकाल मार्चपर्यंतचे होते. त्यामुळे असंही मानलं जात आहे की, आगामी तिमाहींमध्ये या कंपन्यांच्या नफ्यावर झालेला विपरित परिणाम दिसू शकतो.