Pradeep Pendhare
जागतिक स्तरावर इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित सांगितलं.
भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' धोरणामुळे केवळ परकीय चलनात मोठी बचत केली नाही, तर कच्च्या तेलावरील अवलंबित्वही कमी झालं आहे.
इथेनॉल निर्मितीमुळे भारताचे सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.
भारत सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल (E20) मिसळण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताने 4 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात वाचवली आहे.
दहा वर्षांत इथेनॉल पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळाले असून, इथेनॉलमुळे हा पैसा देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्याचं पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून बनवले जाते. यामुळे तेल कंपन्यांकडून मिळणारा पैसा थेट देशातील शेतकऱ्यांच्या खिशात गेला आहे.
भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. कार्बन उत्सर्जनात घट झाली असून भारताच्या पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत मिळत आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका आहे. अशा वेळी भारताचे हे स्वदेशी इंधन धोरण देशाला मोठा आधार देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केलं.