Rashmi Mane
आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज देशाच्या स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि ओळखीचा प्रतीक आहे. भारतासाठी हा ध्वज म्हणजे आपल्या संस्कृती, ऐक्य आणि स्वातंत्र्याची साक्ष आहे.
भारताचा सध्याचा तिरंगा 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने अधिकृतपणे स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 दरम्यान तो भारताच्या अधिराज्याचा ध्वज होता.
तिरंग्यांच्या तिन्ही रंगांच्या सुंदर संगमामुळे हा ध्वज जगभरात आपला वेगळेपणा निर्माण करतो.
तिरंग्यात तीन आडव्या पट्ट्या वर केशरी, पांढरा आणि हिरवा. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.
ध्वजातील वरची केशरी पट्टी देशाची ताकद, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या धैर्याची आठवण करून देतो.
मधली पांढरा रंग शांतता, सत्य आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. अशोकचक्र असलेली ही पट्टी राष्ट्राच्या नैतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करते.
तळाशी असलेला हिरवा रंग भूमीची सुपीकता, प्रगती, विकास आणि समृद्धीचे प्रतिक आहे. तो पर्यावरणाशी असलेले आपल्या देशाचे नाते दाखवतो.
तिरंग्याच्या प्रत्येक रंगात आणि अशोकचक्रात देशाच्या एकतेचा, धैर्याचा आणि प्रगतीचा संदेश आहे. हा फक्त ध्वज नसून आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा जिवंत प्रतीक आहे.