Aslam Shanedivan
आपल्या देशात जसे रस्त्यांचे जाळे आहे. तसेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वेचे जाळं पसरलेले आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वेची सुविधा आहे. पण याच रेल्वेने तुम्हाला परदेशातही जाता येतं. त्यासाठी देशात ही रेल्वे स्थानके ओळखली जातात
भारतात अशी 7 आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके आहेत. यात पहिले स्थानक हल्दीबारी असून ते बांगलादेशच्या सीमेवर आहे. येथून बांगलादेशात जाण्यासाठी थेट ट्रेन पकडता येते.
पश्चिम बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्टेशनेही बांगलादेशला जाता येते.
पश्चिम बंगालमधील राधिकापूर रेल्वे स्थानकावरून बांगलादेशला जाता येते. हे भारतातील तिसरे रेल्वे स्टेशन आहे जिथून बांगलादेशला जाता येते.
पश्चिम बंगालप्रमाणे बिहारच्या मधुबनी येथील जय नगर रेल्वे स्थानकावरून परदेश दौरा करता येतो. येथून नेपाळला जाता येतं.
जोगबनी स्थानकावरून देखील नेपाळला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध असून ते नेपाळ खूप जवळ आहे.
पंजाबचे अटारी रेल्वे स्टेशनचे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशन असून येथून पाकिस्तानमध्ये जाता येते. येथे प्रवास करताना पासपोर्ट अनिवार्य आहे.